हुंडाबळी मृत्यू तेव्हाच मानल्या जातं जेव्हा विवाहितेचा मृत्यू लग्ना पासून 7 वर्षाच्या आता झाला असेल तर. पण त्यासाठी काही अटी आहेत त्या म्हणजे हा मृत्यू नैसर्गिक व सामान्य परिस्थितीसी विसंगत म्हणजेच न जुळणारा असावा. म्हणजेच नैसर्गीक मृत्यू झाल्यास या कलमांतर्गत केस बूक होणार नाही.
मग कोणत्या परिस्थितीत मृत्यूला हुंडाबळीचा मृत्यू मानला जाईल? सारच्यांकडून छळ, जाळुन मारणे, आत्महत्या किंवा आजून कोणतिही पध्दत जी शंकास्पद असेल न नैसर्गीक वाटत नसेल तर मग अशा मृत्यूला हुंडाबळी मृत्यू मानला जाईल.
केस: हेमचंद्र वि. हरियाणा सरकार ( 1995, SC,120 AIR)
हिमाचल प्रदेश सरकार वि. निक्कुराम (AIR 1995, SC 67) या केसमध्ये मा. सर्वोच्च न्यायालयाने मिळालेले पुरावे हुंडाबळीचा मृत्यू हे सिध्द करण्यास पुरेसे नाहीत म्हणून आरोपीस दोषमुक्त केले.
त्यामुळे केसचा बारकाईने अभ्यास करूनच युक्तीवाद करावा.
No comments:
Post a Comment